साडेसाती कायम; स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई

Share

हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा तर इतर खेळाडूंना ६ लाखांचा दंड

लखनौ : मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामने खेळले आहेत. त्यामध्ये मुंबईला १० पैकी ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटसने पराभूत केले. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई इंडियन्सवर मोठी कारवाई केली आहे. हार्दिक पांड्याला एका चुकीसाठी दोषी धरत त्याच्यावर २४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईच्या इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी दुसऱ्यांदा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडून म्हणजेच मुंबईकडून अशी चूक पुन्हा झाल्यास कॅप्टन म्हणून त्याच्यावर एक सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.

बीसीसीआयने ही कारवाई करताना म्हटले की, आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने केवळ हार्दिक पांड्याला दंड करण्यात आलेला नाही तर संघातील इतर खेळाडूंना देखील दंड करण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरसह सर्व खेळाडूंना दंड करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम यात जी कमी असेल तितक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

33 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

53 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago