साडेसाती कायम; स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई

हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा तर इतर खेळाडूंना ६ लाखांचा दंड


लखनौ : मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. लखनौ सुपर जाएंटस विरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये १० सामने खेळले आहेत. त्यामध्ये मुंबईला १० पैकी ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला काल लखनौ सुपर जाएंटसने पराभूत केले. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई इंडियन्सवर मोठी कारवाई केली आहे. हार्दिक पांड्याला एका चुकीसाठी दोषी धरत त्याच्यावर २४ लाख रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईच्या इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सला स्लो ओव्हर रेट प्रकरणी दुसऱ्यांदा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने हार्दिक पांड्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडून म्हणजेच मुंबईकडून अशी चूक पुन्हा झाल्यास कॅप्टन म्हणून त्याच्यावर एक सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते.


बीसीसीआयने ही कारवाई करताना म्हटले की, आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून दुसऱ्यांदा ही चूक झाल्याने केवळ हार्दिक पांड्याला दंड करण्यात आलेला नाही तर संघातील इतर खेळाडूंना देखील दंड करण्यात आलेला आहे. इम्पॅक्ट प्लेअरसह सर्व खेळाडूंना दंड करण्यात आला आहे. सर्व खेळाडूंना सहा लाख रुपये किंवा मॅच फीच्या २५ टक्के रक्कम यात जी कमी असेल तितक्या रकमेचा दंड आकारण्यात आला आहे.

Comments
Add Comment

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला