हायवेवर प्रवाशांनी भरलेल्या पिकअप व्हॅनची कारशी टक्कर,८ जणांचा मृत्यू

छत्तीसगड: छत्तीसगडच्या बेमेतरा येथे रविवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. यात तीन मुलांसह आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रायपूरच्या एम्समध्ये धाडण्यात आले आहे.


बाकी जखमींवर बेमेतरा आणि सिमगा येथे सीएचसीमध्ये उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


ही दुर्घटना बेमेतरा येथील कठिया पेट्रोल पंपाजवळ घडली. येथे प्रवाशांनी गच्च भरलेल्या पिकअप ट्रके रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टाटा ४०७ गाडीला टक्कर मारली.





कौटुंबिक कार्यक्रमातून परतत होते कुटुंब


पिकअप गाडीमध्ये असलेले सर्व जण एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिरैया येथे गेले होते. येथून ते पर्थरा या आपल्या गावी परतत होते. अपघाताची सूचना मिळताच पोलिसांची टीम आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला