farmer scheme : शेतकऱ्यांना 'या' तीन योजना ठरताहेत वरदान; होणार चांगला फायदा

जाणून घ्या कोणत्या आहेत त्या योजना?


मुंबई : कडकडीत ऊन व अवकाळी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाचे नुकसान होऊन जाते. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि कठीण काळात शेती करू शकतात. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना आणखी तीन योजना आखल्या आहेत. या तिन्ही योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते. जाणून घ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती.



पंतप्रधान पीक विमा योजना


शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून मदत करते.



किसान क्रेडिट कार्ड


किसान क्रेडिट कार्ड हीदेखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना १९९८ सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते.



पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना


या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत मिळते. प्रत्येक चार महिन्यांला ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करता येतो.

Comments
Add Comment

महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक प्रशिक्षण केंद्रांची केली पाहणी

लोअर परळ आणि कांदिवली प्रशिक्षण केंद्रांना दिली भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी

कांदिवली - बोरिवली सहाव्या मार्गामुळे २२ नवीन लोकल फेऱ्या

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन सेवा

वेगवान बहिरी ससाणा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात!

ताशी २९० किमीचा वेग नाशिक : हवेत अविश्वसनीय वेगाने झेपावणारा, पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार