Water Supply : मुंबईकरांवर पाणीबाणी! 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

'पाणी जपून वापरा' असे आवाहन


मुंबई : सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आता मुंबईकरांनाही पाणीबाणीच्या संकटाला समोर जावे लागणार आहे. मे महिन्यात मुंबईमधील कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं व बुधवारीच जास्तीचा पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.


मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतलं आहे. हे काम पुढील आठवड्यात गुरुवार, २मे ते शुक्रवार, ३मे रात्री १० या वेळेत करण्यात येणार असल्याने २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी बंद असलेल्या जलवाहिनीचे २४ तासांत अलगीकरण करण्यात येणार आहे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा असेल तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पालिकेने सांगितले.



या भागात पाणीपुरवठा बंद-



  • गांधी नगर, संजय नगर, लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, , सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव, बंदर पखाडी, भाबरेकर नगर या परिसरात शुक्रवारी ३ मे रोजी पाणी येणार नाही.

  • जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत या परिसरात देखील ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

  • चारकोप म्हाडा सेक्टर – ०१ ते ०९ मध्ये ३ मे रोजी पाणीपुरवठा पूर्णता बंद असणार आहे.

  • आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम), महावीर नगर, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, म्हाडा एकता नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण येथे गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी रात्री १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र