निवडणुकीनंतर उबाठा सेनेचे अस्तित्व संपून जाईल: नारायण राणे

  44

रत्नागिरी : येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे अस्तित्व "पुसून" जाईल, त्याला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार असतील, असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडत आहे ते "लोकशाहीसाठी चांगले नाही" असे त्यांनी मत व्यक्त केले.


रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवत असलेले राणे यांनी रत्नागिरीतील प्रचार सभेत व्यस्त असताना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मला लोकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीतील सर्व पक्षांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे मी सहज निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खास गप्पा मारताना राणे म्हणतात, “मी सेनेत असताना त्यांनी मला मुख्यमंत्री बनण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धोका म्हणून पाहिले. मी सोडल्यानंतरही उध्दव ठाकरे बदल्याच्या भावनेने पाहत राहिले. माझ्या मुंबईतील घरातील बांधकामावर त्यांनी कारवाई सुरू केली, मला तुरुंगात टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला. मी शरण जावे अशी त्याची अपेक्षा होती. मी केले नाही. त्याने माझ्याशी जे केले त्याची किंमत जनता मतपेटीतून देईल.”


मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ही लोकसभेची जागा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी हवी होती. ते नाराज असावेत?,असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावेळी राणे म्हणाले की, ते जागा मागत होते.पण ते आधी होते.एकदा माझ्या नावाची घोषणा झाल्यावर उदय आणि किरण दोघेही आले आणि त्यांनी मला सांगितले की ते माझ्या विजयासाठी काम करतील. ते प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.


जैतापूर अणु प्रकल्प आणि नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प यांसारखे कोकणातील मोठे प्रकल्प अलीकडे रखडले आहेत. प्रदेशाचा मोठा भाग तुमच्या मतदारसंघात येत असल्याने तुम्ही इथल्या विकासाबाबतच्या चिंता दूर करत आहात का? या प्रश्नांवर राणे यांनी विकासात कोकण मागे पडत असेल तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असे स्पष्ट मत मांडले. उध्दव ठाकरे यांना प्रत्येक प्रकल्पात वाटा हवा असतो. त्यांनी जैतापूरला विरोध केला कारण कोळसा आधारित वीज उत्पादकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर या प्रदेशात ₹३ लाख कोटींची गुंतवणूक झाली असती आणि छोटे कारखाने आणि नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या. स्वतःच्या स्वार्थापोटी उद्धव यांनी हे होऊ दिले नाही, असा आरोप राणे यांनी यावेळी केला. मात्र,स्थानिक लोकही या प्रकल्पांना विरोध करत होते. त्यांना खोटे सांगितले गेले. आम्ही त्यांना प्रकल्पाचे फायदे पटवून दिले आणि नंतर बहुतेकांनी त्यांना संमती दिली.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने