Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रवास होणार आणखी जलद

  140

भुयारी मार्गाचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल; अशी असतील मार्गिकेची वैशिष्ट्ये


मुंबई : Colaba-Bandra-Seepz या भुयारी मार्गासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) सज्ज असून या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या कामाची सातत्याने पाहणी करत कामाचा आढावा घेतला जात असून ३३.५ किमीच्या कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो ३ (Mumbai Metro 3) मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. संपूर्णत: भुयारी असलेल्या या मार्गिकेचे काम पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी या प्रकल्पास विलंब झाला होता. आता तीन टप्प्यात मार्गिका सुरू करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे.


दरम्यान, भुयारी मार्गावरील पहिल्या टप्प्याच्या चाचण्या मे अखेरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. त्या हेतूनेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) तयारी पूर्ण केली आहे. या चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इंडीपेंडंट सेफ्टी असेसर (ISA) आणि कमिशनअर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS) यांना तपासणीसाठी बोलविले जाणार आहे. त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीम डोअर, ट्रॅक्शन आणि रुळ आदींच्या चाचण्यांचा समावेश आहे. तर पुढील आठवड्यापासून मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या मे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरसीने केले आहे.



कधी सुरु होणार मेट्रो ३ मार्गिका?


मेट्रो गाडीच्या स्टॅटीक लोडसह चाचण्या पुर्ण होताच मेट्रो मार्गिका संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया एमएमआरसीकडून सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यांत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यांची चिन्हे आहेत.



मेट्रो ३ मार्गिकेची वैशिष्ट्ये


पहिला टप्पा : आरे ते बीकेसी
पहिल्या टप्प्यातील एकूण स्थानके: १०
एकूण खर्च : ३७,००० कोटी रुपये
एकूण स्थानके : २७



'या' वेळेत धावणार मेट्रो


आरे-बीकेसी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर येथे सुमारे ९ मेट्रो ट्रेन धावणार आहेत. यापैकी फक्त दोनच मेट्रो ट्रेन देखभाल आणि स्टँडबायसाठी ठेवण्यात येणार आहेत. या मेट्रो ट्रेन सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत धावतील. एक्वा लाइन कॉरिडॉर ३३.५ किमी पर्यंत विस्तारित आहे. या मार्गावर एकूण १० स्थानके असून दररोज सुमारे २६० राउंड-ट्रिप सेवा उपलब्ध असतील.


Comments
Add Comment

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)