MI vs RR: राजस्थानने मुंबईला ९ विकेटनी हरवले, संदीपच्या 'पंजा'ने केली कमाल

मुंबई: आयपीएल २०२४चा(ipl 2024) ३८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना १७९ धावा केल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने यशस्वी जायसवालच्या शानदार खेळीच्या जोरावर १९व्या षटकांतच पूर्ण केले.

मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरणारा रोहित शर्मा आणि इशान किशन फ्लॉप ठरला. रोहितने ५ बॉलमध्ये ६ धावा केल्या आणि तो बाद झाला. तर किशन शून्यावर बाद झाला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवनेही ८ बॉलमध्ये १० धावा केल्या. यानंतर तिलक वर्मा आणि नेहाल वधेरा यांचे वादळ पाहायला मिळाले. तिलकने मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली आणि ४५ बॉलमध्ये एकूण ६५ धावा केल्या.

मोहम्मद नबीने काही वेळ त्याची साथ दिली त्याने १७ बॉलमध्ये २३ धावा केल्या. आयपीएल २०२४च्या आपल्या पहिल्याच सामन्यात नेहालने कमालीची फलंदाजी केली. नेहाल २४ बॉलमध्ये ४९ धावा करत बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ३ चौकार लगावले. कर्णधार हार्दिक पांड्या १० बॉलमध्ये १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

संदीप शर्माच्या पाच विकेट


संदीप शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना एकूण ५ विकेट घेतल्या. संदीपने आपल्या स्पेलमध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड आणि जेराल्ड कोएत्जे यांची विकेट घेतली. संदीपने आपल्या ४ षटकांत एूण १८ धावा दिल्या.
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या