MI vs RR: राजस्थानने मुंबईला ९ विकेटनी हरवले, संदीपच्या 'पंजा'ने केली कमाल

  45

मुंबई: आयपीएल २०२४चा(ipl 2024) ३८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ९ विकेटनी शानदार विजय मिळवला. सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्यांदा बॅटिंग करताना १७९ धावा केल्या होत्या. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने यशस्वी जायसवालच्या शानदार खेळीच्या जोरावर १९व्या षटकांतच पूर्ण केले.

मुंबई इंडियन्ससाठी सलामीला उतरणारा रोहित शर्मा आणि इशान किशन फ्लॉप ठरला. रोहितने ५ बॉलमध्ये ६ धावा केल्या आणि तो बाद झाला. तर किशन शून्यावर बाद झाला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवनेही ८ बॉलमध्ये १० धावा केल्या. यानंतर तिलक वर्मा आणि नेहाल वधेरा यांचे वादळ पाहायला मिळाले. तिलकने मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली आणि ४५ बॉलमध्ये एकूण ६५ धावा केल्या.

मोहम्मद नबीने काही वेळ त्याची साथ दिली त्याने १७ बॉलमध्ये २३ धावा केल्या. आयपीएल २०२४च्या आपल्या पहिल्याच सामन्यात नेहालने कमालीची फलंदाजी केली. नेहाल २४ बॉलमध्ये ४९ धावा करत बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ३ चौकार लगावले. कर्णधार हार्दिक पांड्या १० बॉलमध्ये १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

संदीप शर्माच्या पाच विकेट


संदीप शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना एकूण ५ विकेट घेतल्या. संदीपने आपल्या स्पेलमध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड आणि जेराल्ड कोएत्जे यांची विकेट घेतली. संदीपने आपल्या ४ षटकांत एूण १८ धावा दिल्या.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार