Uday Samant : गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर समोर आली उदय सामंतांची प्रतिक्रिया

Share

यवतमाळ येथे सामंतांच्या गाडीवर करण्यात आला होता हल्ला

मुंबई : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीतील सर्वच नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मेळावे, प्रचारसभा, बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच काल यावतमाळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सभेदरम्यान मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यातील वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ही सभा सुरू असताना पार्किंगमध्ये उभे असलेल्या उदय सामंत यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत त्यांच्या गाडीचा समोरील बाजूची काच फुटली आहे. ही बाब सभा संपल्यानंतर लक्षात आली.

गाडीवर हल्ला झाल्याचे लक्षात आल्यावर काही वेळासाठी तणाव निर्माण झाला. हल्ला झाला त्यावेळी गाडीमध्ये कोणीही नव्हते, दगडफेक नेमक्या कोणत्या व्यक्तीने केली हे कळले नसून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे. यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचारसभेवेळी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. उदय सामंत त्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीत पुढे रवाना झाले.

या संपूर्ण घटनेबाबत उदय सामंत म्हणाले, हल्ल्यात कुणालाही दुखापत झालेली नाही. मी या कारमध्ये नसल्याने सुखरूप आहे. हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देश्याने झाला, कुणी दगड मारला हे कळालेले नाही, असं उदय सामंत म्हणाले.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

24 mins ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

1 hour ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

2 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

2 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

3 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

4 hours ago