मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे आणि सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारलेला ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट (Sangharsh Yoddha Movie) यावर्षी २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटाची गाणी रिलीज झाली असून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र, एका कारणास्तव या चित्रपटाचे प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) अडवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एकाही दृश्यावर आक्षेप घेतलेला नाही. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेली आचारसंहिता, मतदान आदींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, ‘हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे. आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याचं दुःख होत आहे’. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारा अभिनेता रोहन पाटील म्हणाला की, ‘हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट चित्रपट होणार’.
हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. चित्रपटाच्या टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितले की, आपला चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने थांबवला असला, तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट पाहील. चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन चित्रपटा विषयी बोलेन असंही त्यांनी म्हटलं.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…