Buldhana News : बुलढाण्यात काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर! काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये झाली हाणामारी

  119

अंगावर धावून गेले, गाडीच्या काचाही फोडल्या; उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर नेमकं काय घडलं?


बुलढाणा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सध्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार (Buldhana Loksabha) नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांच्या प्रचारार्थ खामगाव (Khamgaon) येथे दाखल झाले होते. मात्र, त्यांची सभा संपताच काँग्रेसच्या (Congress) दोन नेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. प्रचारानंतर लगेच हा प्रसंग घडल्याने बुलढाण्यात मविआची प्रतिमा मलीन झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील व स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते. उध्दव ठाकरे यांचे भाषण संपताच नेते आपल्या मार्गाने निघाले.


दरम्यान, सभा संपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा (Dilipkumar Sananda) व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण (Tejendra Singh Chavan) यांच्यात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरून काँग्रेस सेवादालचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तेथे आली. दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली.


काही वेळाने या शाब्दिक वादाचे रुपांतर धक्काबुक्कीमध्ये झाले. यावेळी काही कार्यकर्ते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. या घटनेमुळे सभास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण सोडविले. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी