Monday, January 20, 2025
Homeताज्या घडामोडीNo Water No vote : पाणी नाही तर मतदान नाही!

No Water No vote : पाणी नाही तर मतदान नाही!

कुर्ल्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

मुंबई : सध्या सर्वत्रच पाणीबाणीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. एकीकडे कडाडते ऊन, निवडणुका तर दुसरीकडे पाणीटंचाईच्या समस्या अनेक ठिकाणी वाढत आहेत. अशातच मुंबईतील कुर्ला विभागातील नागरिकांनी येत्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून कुर्ला विभागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. कुर्ल्यातील मुरली मिलन सोसायटी, मोरारजी टेरेस परिसरातील रहिवाशी पाण्याच्या समस्येला त्रस्त असल्याची माहिती दिली. याच त्रस्त रहिवाशांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरातील सोसायटी बाहेर ‘नो वॉटर नो वोट’, ‘पाणी पुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर मतदानावर बहिष्कार’ असे बॅनर लावत संताप व्यक्त केला आहे. आहेत. याबाबतची सर्वत्र चर्चा सुरु असून प्रशासन या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष देते का हे पहावे लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -