Raj Kundra: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज कुंद्रावर ईडीची कारवाई!

Share

तब्बल ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ३ वर्षापूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावर त्याने जामीनही मिळवला होता. राज कुंद्रावरील पॉर्नोग्राफीचे प्रकरण निवारत असताना आता ईडीने राज कुंद्रा विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. त्याच्यावर प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंगचा दावा म्हणजेच PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तब्बल ९७.७९ कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

ईडीने बिटकॉइन पॉन्जी स्कॅम अंतर्गत राज कुंद्राविरोधात ही अॅक्शन घेतली आहे. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेयर यांचा समावेश आहे. राज कुंद्राला यूक्रेनमध्ये मायनिंग फार्म उभं करण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रमोटर आणि मास्टरमांइंड अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स घेतले होते. तर या सगळ्या प्रकरणात राज कुंद्रानं हेराफेरी केली होती, असा ईडीने केलेल्या चौकशीत खुलासा झाला आहे.

यापूर्वीही राज कुंद्राची २००० कोटींच्या बिटकॉइन घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की; ठाणे क्राइम ब्रान्चमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीसाठी राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडलेल्या प्रकरणामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

8 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

9 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

9 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

10 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

11 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

11 hours ago