IPL 2024 Points Table: दिल्लीच्या धमाकेदार विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल

मुंबई: आयपीएल २०२४चा ३२ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरातला त्यांच्यात घरात एकतर्फी ६ विकेटनी हरवले. दिल्लीच्या सर्व खेळाडूंनी छोटी मात्र महत्त्वाच्या खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले. दिल्लीने हा सामना ६७ चेंडू राखत जिंकला. यामुळे त्यांना रनरेटमध्ये मोठा फायदा झाला.


मोठ्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे आता ६ गुण झाले आहेत आणि संघ -0.074 नेट रनरेटसोबत नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आली आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सला या पराभवामुळे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातचे ६ गुण आहेत मात्र त्यांचा रनरेट -1.303 वर पोहोचला आहे.


आयपीएल २०२४मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सने आतापर्यंत सर्व ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला. मात्र रनरेटमुळे दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातपेक्षा एका स्थानाने वर आहे.



हे आहेत टॉप ४ संघ


पॉईंट्स टेबलमध्ये १२ गुणांसह राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचेही ८ गुण आहे. मात्र कोलकात्याचा रनरेट चेन्नईपेक्षा चांगला आहे. सनरायजर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे आणि त्यांचेही ८ गुण आहेत.



बाकी संघांची स्थिती


लखनऊ सुपर जायंट्सचे ६ गुण आहेत आणि हा संघ पाचव्या स्थानावर आहे. दिल्ली बुधवारचा सामना जिंकल्यावर सहाव्या तर गुजरातचा पराभव झाल्याने सातव्या स्थानावर ढकलली गेली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या ३ संघांबाबत बोलायचे झाल्यास पंजाब किंग्स ८व्या स्थानावर आहे. नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स आहे त्यांचे ४ गुण आहेत. तर शेवटच्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. त्यांचे केवळ २ गुण आहेत.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात