Albattya Galbattya: अमावस्येच्या रात्रीला साथ आहे रातकिड्यांची; बच्चेकंपनीला साद घालतेय ‘3D’ जादू ‘चेटकिणीची’!

अलबत्त्या गलबत्त्या नाटकानंतर होणार सिनेमात रुपांतर; 'या' दिवशी होणार प्रदर्शित


मुंबई : चिंची चेटकीण आणि गुप्तधनाची गोष्ट सांगणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या (Albattya Galbattya) नाटकाने चांगलीच रंगभूमी गाजवली होती. 'अलबत्त्या गलबत्त्या' पेक्षा चिंची चेटकीण जास्त लोकप्रिय झाली. छोट्या प्रेक्षकांसह मोठ्यांनीही या नाटकला उत्सफूर्त प्रतिसाद दिला होता. आता हे नाटक सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


सिनेमाच्या टीझर मध्ये वैभव चिंची चेटकिणीच्या रूपात दिसत असून "किती गं बाई मी हुशार" हे चेटकिणीचं लाडकं वाक्य ऐकू येतं. या टीझरने सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच या टीझरवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स करत या सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.


'अलबत्त्या गलबत्त्या' या चित्रपटात वैभवसोबत अक्षय मिटकल, शंतनू गांगणे, लोकेश मांगडे, मनीष पिंपुटकर, अनुष्का पिंपुटकर, विराज टिळेकर, अभय पिंपुटकर, सोनिया सहस्त्रबुद्धे, यांच्या मुख्य भूमिका आहेत. वरुण नार्वेकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून थ्री डी रूपात बच्चेकंपनीला हा सिनेमा एन्जॉय करता येणार आहे. संजय छाब्रिया, सुधीर कोलते आणि ओंकार माने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


रत्नाकर मतकरी यांनी नाटक स्वरूपात लिहलेल्या या अलबत्त्या गलबत्त्या गोष्टीवर आधारित सिनेमा येत असून सिनेमाच्या दृष्टीने त्यात कथानकात काय बदल झाले असतील हे पाहणं चित्तवेधक असणार आहे. १ मे २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Comments
Add Comment

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

दीपिकाच्या रंगावर प्रश्नचिन्ह? ध्रुव राठीच्या व्हिडीओने उडवली बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं

तरुणाईत अक्षय खन्नाची क्रेझ, चाहत्यांसाठी २०२५ ठरले खास

मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या