निवडणूक काळात मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

  44

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला आढावा


मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेऊन निवडणूक कालावधीत यंत्रणेने सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.


जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.


सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी


वाढता उन्हाळा आणि अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा यासह सर्व नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासन हे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींमुळे मतदान प्रक्रियेची गती मंदावली जाऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मतदानाला येणाऱ्या मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यादृष्टीने प्रशासन खबरदारी घेतली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री क्षीरसागर यांनी सांगितले.


आपत्कालीन मदत यंत्रणांना सज्जतेचा इशारा


वॉर्ड स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशन्स, हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांची उपलब्धता याची माहिती ठेवणे आवश्यक आहे तसेच या यंत्रणांनीही या काळात सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.


याशिवाय, वाढत्या उन्हाळ्याच्या अनुषंगाने हवामान विभागाने जारी केलेली माहिती तात्काळ निवडणूक यंत्रणेला देणे अत्यावश्यक राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती आवश्यक कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता