IMEI : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला? 'हा' नंबर शोधून देईल तुमचा हरवलेला फोन

  42

मुंबई : प्रवासादरम्यान किंवा गर्दीच्या ठिकाणी कित्येकांचे मोबाईल चोरी होतात. अशा ठिकाणी चोर आपला हात साफ करून घेतात. एकदा चोरीला गेलेला फोन पुन्हा मिळेल अशी शाश्वती कोणाकडूनही मिळत नाही. अगदी पोलीस स्थानकात तक्रार केली तरीही मोबाईल चोरीच्या बाबतीत पोलीस हात वर करतात. मात्र मोबाईल मधील 'हा' नंबर तुमच्या हरवलेल्या फोनपर्यंत लगेचच तुम्हाला पोहोचवू शकतो. तसेच या नंबरच्या आधारे चोराचा शोध देखील घेतला जातो.


IMEI (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) हा १५ अंकी युनिक कोड आहे, जो प्रत्येक मोबाईल फोनला दिला जातो. एक प्रकारे हा फोनचा “फिंगरप्रिंट” आहे, ज्याद्वारे तो जगभरात ट्रॅक केला जाऊ शकतो. हा विशेष प्रकारचा नंबर आहे ,जो आपल्या मोबाईलचे लोकेशन सांगतो. हा नंबर मोबाईल फोनच्या बॅटरीवर लिहिलेला असतो. याच्या मदतीने मोबाईल वापरणारा यूजर कोठे आहे हे ओळखले जाते. आपला मोबाईल फोन हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर चोराने सिमकार्ड बदलला तरीदेखील IMEI नंबरच्या आधारे आपला फोन परत मिळविला जातो.



IMEI क्रमांकाचे महत्त्व



  • IMEI नंबर चोरीला गेलेला फोन ट्रॅक करण्यात मदत करू शकतो.

  • तुमचा फोन हरवला किंवा तो चोरीला गेला, तर तुम्ही IMEI नंबर वापरून टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून नेटवर्क ब्लॉक करू शकता.

  • बनावट फोन ओळखण्यासाठी IMEI नंबर देखील वापरला जाऊ शकतो.

  • काही प्रकरणांमध्ये, IMEI नंबरचा वापर वॉरंटी दावे करण्यासाठी किंवा विमा इत्यादीसाठी देखील केला जाऊ शकतो.


नेहमी सुरक्षित ठेवा IMEI नंबर


तुम्ही तुमचा IMEI नंबर कोणाशीही, विशेषतः अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नये. तुमच्या फोनवर मजबूत पासवर्ड किंवा पिन सेट करा. तुम्ही घराबाहेर असाल, तर तुमचा फोन नेहमी सोबत ठेवा. तुमचा फोन हरवल्यास किंवा तो चोरीला गेल्यास ताबडतोब पोलिस तक्रार नोंदवा. IMEI नंबर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यास आणि चोरीला गेल्यास तो शोधण्यात मदत करू शकते.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत