Ashish Shelar : न्यायपत्रानेच काँग्रेसची 'अन्याययात्रा' काढली!

काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर आशिष शेलारांचा कवितेतून खोचक टोला


मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) काँग्रेसला (Congress) समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. सांगली (Sangli), भिवंडी (Bhiwandi) या काँग्रेसच्या हक्काच्या जागा मागण्यात वरिष्ठ नेते कमी पडले त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. यामुळे मविआची प्रतिमा जनतेच्या मनात मलीन होत चालली असून येत्या काळात निवडणुकीपर्यंत तरी मविआ टिकणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा भाजप नेत्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काँग्रेसच्या या नाराजीनाट्यावर कवितेतून खोचक टोला लगावला आहे.


आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक कविता पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की,
'काँग्रेसची "अन्याय यात्रा" !


सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली?
मुंबईत काँग्रेस "न्याया"साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!


काँग्रेसची अवस्था पाहून "न्यायपत्र" आतल्या आत रडलं
स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं


मला न्याय देता का न्याय?
मला न्याय देता का न्याय?


असा टाहो फोडत..


"न्यायपत्रा" नेच काँग्रेसची "अन्याय यात्रा" काढली!'





आशिष शेलारांच्या या टीकेमुळे मविआतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर मविआमध्ये आणखी काय काय उलथापालथी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी