पुणे : ‘काही लोक घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता ते पंतप्रधान मोदींवर टीका करतात. आता मोदींची वक्रदृष्टी जर यांच्यावर पडली तर फेसबुकवर बोलणाऱ्याच्या तोंडाला फेस येईल. बोलताना जरा भान बाळगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.
पुण्यात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यासोबतच त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली.
‘नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात केलेले काम हे काँग्रेसला मागील ५० वर्षात जे जमले नाही ते काम केले आहे. जगात देशाची प्रतिमा उंचावली असून देश बोलतो ते जग ऐकत आहे असे वातावरण आहे. कोरोना काळात काही लोक घरात बसून होते ते नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहे.
कार्यकर्ता ज्यावेळी सक्रिय होतो, तेव्हा सर्वत्र राज्यात महायुती वातावरण दिसून येत आहे. आता मनसेने आपल्याला पाठिंबा दिला आहे, आपली ताकद मोठी आहे. आपल्या महायुतीचे वातावरण राज्यभर आहे. पुणे लोकसभेचे उमदेवार मुरलीधर मोहोळ आणि इतर आपले सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, कारण आपले कार्यकर्ते चार्ज आहेत.गेल्या ३० वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. त्यामध्ये काही विघ्न आली, पण आपण पुन्हा युती केली आणि आता अजित पवार सोबत आले. आपली महायुती मजबूत झाली. अनेक लोक म्हणत होते की सरकार पडणार पडणार, आता बंद झालं आहे असं म्हणणं. आता तर मनसेनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…
कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…
इस्लामपूर न्यायालयाचा मोठा निर्णय सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी…
मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद…