water shortage: रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई आता पोहोचली शाळांपर्यंत

  40

पाणी नाही, तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही


अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईची झळ आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेत पाणी नसल्याचे कारण देत शाळेत माध्यान्ह भोजन शिजले नाही. त्यामुळे आठवड्यापासून विद्यार्थ्यांना घरून डबा घेऊन जावे लागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत नेहुली गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गावात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे.


एमआयडीसीमार्फत गावात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सध्या पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. तर खासगी वाहिनीवरून सध्या ग्रामस्थ पाणी घेत आहेत. शाळेतही पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या शाळेत पाणी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आठवडाभर विद्यार्थी आणताहेत घरून डबागेल्या आठवड्यापासून शाळेत पाणी नसल्याने अन्न शिजविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन बंद झाले आहे. विद्यार्थी सध्या शाळेत येताना घरून डबा घेऊन येत आहेत.



प्रशासन अनभिज्ञ


संबंधित समस्येबाबत शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना संपर्क केला असता माहिती घेते, असे म्हणाल्या. तर अलिबागच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या