water shortage: रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई आता पोहोचली शाळांपर्यंत

पाणी नाही, तर दुपारचे जेवणही नाही; ८ दिवसांपासून जिल्हा परिषद शाळेत चूल पेटली नाही


अलिबाग : रायगडमधील पाणीटंचाईची झळ आता शाळांपर्यंत पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नेहुली शाळेत पाणी नसल्याचे कारण देत शाळेत माध्यान्ह भोजन शिजले नाही. त्यामुळे आठवड्यापासून विद्यार्थ्यांना घरून डबा घेऊन जावे लागत आहे. निवडणुकीची धामधूम सुरु असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळ मिळालेला नाही. खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत नेहुली गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गावात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे.


एमआयडीसीमार्फत गावात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सध्या पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळत आहे. तर खासगी वाहिनीवरून सध्या ग्रामस्थ पाणी घेत आहेत. शाळेतही पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या शाळेत पाणी येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. आठवडाभर विद्यार्थी आणताहेत घरून डबागेल्या आठवड्यापासून शाळेत पाणी नसल्याने अन्न शिजविण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन बंद झाले आहे. विद्यार्थी सध्या शाळेत येताना घरून डबा घेऊन येत आहेत.



प्रशासन अनभिज्ञ


संबंधित समस्येबाबत शाळा व्यवस्थापनाने शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना संपर्क केला असता माहिती घेते, असे म्हणाल्या. तर अलिबागच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही.

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या