T20 World Cup Squad: ऋषभ पंत खेळणार टी-२० वर्ल्डकप? जाणून घ्या कधी होणार भारतीय संघाची घोषणा

मुंबई: सध्याच्या वेळेस क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या रोमांचक सामन्यांच्या आनंद घेत आहेत. मात्र यातच टी-२० वर्ल्डकप २०२४ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. यात स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला स्थान मिळू शकते.


३० डिसेंबर २०२२च्या रात्री ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. यानंतर तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने आता आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याने जबरदस्त फॉर्मात पदार्पण केले आहे.



पंतसह अनेक खेळाडूंवर नजर


यातच मीडिया रिपोर्टनुसार टी-२० वर्ल्डकपसाठी ऋषभ पंतला संघात निवडले जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक खेळाडूंवर बीसीसीआयच्या सिलेक्टर्सची नजर आहे.


पंत आयपीएलमध्ये विकेटकीपिंगमध्येही कमाल करत आहे. तो आपल्या लयीमध्ये परतताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने आतापर्यंत दोन अर्धशतके लगावली आहेत.



या महिन्याच्या अखेरीस होणार बैठक


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या फॉर्मात आणि पुढे तो किती फिट राहतो हे पाहता येईल. दरम्यान, सध्या तो फिट दिसत आहे. टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता अनेक खेळाडूंवर सिलेक्टर्सची नजर आहे. यात पंतचा समावेश आहे. यावर्षी टी-२० वर्ल्डकप जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना