T20 World Cup Squad: ऋषभ पंत खेळणार टी-२० वर्ल्डकप? जाणून घ्या कधी होणार भारतीय संघाची घोषणा

मुंबई: सध्याच्या वेळेस क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या रोमांचक सामन्यांच्या आनंद घेत आहेत. मात्र यातच टी-२० वर्ल्डकप २०२४ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. यात स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला स्थान मिळू शकते.


३० डिसेंबर २०२२च्या रात्री ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. यानंतर तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने आता आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याने जबरदस्त फॉर्मात पदार्पण केले आहे.



पंतसह अनेक खेळाडूंवर नजर


यातच मीडिया रिपोर्टनुसार टी-२० वर्ल्डकपसाठी ऋषभ पंतला संघात निवडले जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक खेळाडूंवर बीसीसीआयच्या सिलेक्टर्सची नजर आहे.


पंत आयपीएलमध्ये विकेटकीपिंगमध्येही कमाल करत आहे. तो आपल्या लयीमध्ये परतताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंतने आतापर्यंत दोन अर्धशतके लगावली आहेत.



या महिन्याच्या अखेरीस होणार बैठक


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत आपल्या फॉर्मात आणि पुढे तो किती फिट राहतो हे पाहता येईल. दरम्यान, सध्या तो फिट दिसत आहे. टी-२० वर्ल्डकप लक्षात घेता अनेक खेळाडूंवर सिलेक्टर्सची नजर आहे. यात पंतचा समावेश आहे. यावर्षी टी-२० वर्ल्डकप जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय