Onion Export: १५ रुपयांचा कांदा परदेशात चक्क १२० रुपयांना!

दलाल मालामाल पण व्यापारी व शेतकऱ्यांचे हाल


अबू धाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी १२ ते १५ रुपये किलोने कांदा विकला असून तोच कांदा यूएईच्या दुकानात निर्यात केल्यानंतर १२० रुपये किलोने विकला जात असल्याचा आरोप केला आहे.


निवडणुकीच्या (Election) काळात कांद्याचे वाढलेले भाव पाहता सरकारने डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, काही देशांच्या विशेष मागणीनुसार सरकार काही अटींच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर सूट देते. कांद्याच्या निर्यातीवर दीर्घकाळ बंदी असताना, संयुक्त अरब अमिराती सारख्या बाजारपेठेत सरकारने परवानगी दिलेली काही शिपमेंट कवडीमोल भावात विकली गेल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्या आहेत, त्यामुळे निवडक आयातदार प्रचंड नफा कमावत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर कांद्याचे दर प्रति टन ३००-४०० डॉलरच्या दरम्यान आहेत. तर अलिकडच्या काही महिन्यांत, युएई सारख्या प्रमुख बाजारपेठेतील किमती प्रति टन १५०० डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. भारत, पाकिस्तान आणि इजिप्तने लादलेल्या निर्यात निर्बंधांमुळे किमतीत आणखी भर झाली असून देशात अलीकडील शिपमेंटची किमत प्रति टन ५०० डॉलर ते ५५० डॉलर इतकी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.


कांदा निर्यातदारांचे म्हणणे आहे की युएई आयातदारांना अशा शिपमेंट्सद्वारे आधीच ३०० कोटींहून अधिक नफा मिळाला आहे. याचा थेट फायदा यूएईच्या व्यापाऱ्यांना होत आहे. ही निर्यात सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी मालकीची संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जात आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन