Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेस नेत्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा!

काँग्रेस नेत्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा!

पवार, ठाकरेंसमोर नांग्या टाकणारे पराभवाचे खापर माझ्यावर फोडत असल्याचा अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) जागा वाटपामध्ये राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी पवार, ठाकरेंसमोर नांग्या टाकल्या आणि आता ते होणाऱ्या पराभवाचे खापर माझ्या डोक्यावर फोडत असल्याचा पलटवार नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांकडून माझ्यावर केले जाणारे आरोप म्हणजे चोरांनीच उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार सध्या सुरु असल्याचे ते म्हणाले.

नाचता येईना अंगण वाकडे

काँग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला आलेले अपयश आणि भविष्यात होणारा पराभव या सर्वांचे खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्याचे काँग्रेस नेते करत आहेत. ही अत्यंत हास्यास्पद बाब आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांची धूळधाण केली आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. तसेच पक्षश्रेष्ठींना उत्तरही त्यांना देता येत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून माझ्यावर केले जाणारे आरोप म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असा प्रकार असल्याची टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.

गेल्या महिन्यात भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण हेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पेचाला जबाबदार आहेत, असा आरोप सध्या राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. मात्र हे आरोप चव्हाण यांनी धुडकावून लावले आणि काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -