Apple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय आहे कारण?

Share

मुंबई : आयफोन निर्माता कंपनी ॲपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. हे प्रकल्प बंद केल्यानंतर ॲपलने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची टांगती तलवार आहे.

ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. त्यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.

कार विभागातील ३७१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून ३७१ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र अद्यापही ॲपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत.

प्रकल्प बंद झाल्याने २००० कर्मचारी बाधित

अहवालानुसार, कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनल रोबोटिक्स विभागात अनेक लोकांची बदली करण्यात आली आहे. हे प्रकल्प बंद पडल्याने सुमारे २००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

Recent Posts

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

5 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

40 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago