Apple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय आहे कारण?

मुंबई : आयफोन निर्माता कंपनी ॲपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. हे प्रकल्प बंद केल्यानंतर ॲपलने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची टांगती तलवार आहे.


ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. त्यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.



कार विभागातील ३७१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून ३७१ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र अद्यापही ॲपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत.



प्रकल्प बंद झाल्याने २००० कर्मचारी बाधित

अहवालानुसार, कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनल रोबोटिक्स विभागात अनेक लोकांची बदली करण्यात आली आहे. हे प्रकल्प बंद पडल्याने सुमारे २००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

विक्रोळीच्या बुद्ध विहारातून भगवान गौतमांची चोरीला गेलेली मूर्ती मिळाली, सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केला चोराचा पर्दाफाश

मुंबई: विक्रोळी येथील बुध्द विहारातून भगवान गौतम बुध्दांची पुरातन मूर्ती चोरणाऱ्यांना विक्रोळी पोलिसांनी

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता