Apple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय आहे कारण?

मुंबई : आयफोन निर्माता कंपनी ॲपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. हे प्रकल्प बंद केल्यानंतर ॲपलने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची टांगती तलवार आहे.


ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. त्यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.



कार विभागातील ३७१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून ३७१ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र अद्यापही ॲपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत.



प्रकल्प बंद झाल्याने २००० कर्मचारी बाधित

अहवालानुसार, कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनल रोबोटिक्स विभागात अनेक लोकांची बदली करण्यात आली आहे. हे प्रकल्प बंद पडल्याने सुमारे २००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

Comments
Add Comment

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा

मोबाईल गेमची सवय जीवघेणी ठरली, पॉप्युलर गेम खेळताना मुलाचा प्राण गेला

लखनऊ: मोबाईल गेमच्या व्यसनामुळे एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे

इंडिगोने ३० अतिरिक्त A350-900 एअरबस विमानांसाठी ऑर्डर दिली

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने ३० एअरबस A350 विमानांसाठी कराराची घोषणा केली. जूनमध्ये

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन