Apple Layoffs: ॲपलकडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार! काय आहे कारण?

  73

मुंबई : आयफोन निर्माता कंपनी ॲपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. हे प्रकल्प बंद केल्यानंतर ॲपलने ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तर २००० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची टांगती तलवार आहे.


ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने कॅलिफोर्नियामधील ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. त्यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.



कार विभागातील ३७१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून ३७१ कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मात्र अद्यापही ॲपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केले नाहीत.



प्रकल्प बंद झाल्याने २००० कर्मचारी बाधित

अहवालानुसार, कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पर्सनल रोबोटिक्स विभागात अनेक लोकांची बदली करण्यात आली आहे. हे प्रकल्प बंद पडल्याने सुमारे २००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत.

Comments
Add Comment

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये