water shortage: पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट

Share

पालघर : यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात पाणी साठले नाही. अगोदरच कमी पाणी असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट होते. पालघर जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये चाळीस टक्केच पाणीसाठा असल्याने काही दिवसांत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट येणार आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अजूनही पावसाला अडीच ते तीन महिने असल्याने पालघरसह वसई-विरार महापालिका व मीरा- भाईंदर महापालिकेला येत्या काही दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी दोन-अडीच महिन्यांत दोन्ही महापालिकेतील पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा असून या धरणामधून जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे अजूनही काही दिवस कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाणार असल्याने मेपर्यंत जिल्ह्यासह वसईवर आणि मीरा-भाईंदर महापालिकेला पाणीटंचाई भासणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Recent Posts

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

1 minute ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

48 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

1 hour ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

1 hour ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

1 hour ago