Rivers dried up : उन्हाळ्याला सुरुवात नाही तोच १३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं!

देशातील इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा


मुंबई : यंदाच्या वर्षी तापमान (Heat) प्रचंड वाढलं असून धरणांमधील तसेच नद्यांमधील पाणीसाठा कमी (Rivers dried up) झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अजून उन्हाळ्याची (Summer) केवळ सुरुवात झाली असताना देशातील १३ नद्यांमधील पाणी पूर्णपणे आटलं आहे. इतर नद्यांमध्ये गेल्यावर्षीहून कमी पाणीसाठा आहे. ही चिंतेची बाब असून यंदाचा उन्हाळा तहानेने व्याकूळ करणार आहे.


केंद्रीय जल आयोगाचा (Central Water Commission) अहवाल भयावह असून हा उन्हाळा कसा जाणार, असा मोठा प्रश्न देशवासियांसमोर उभा ठाकला आहे. देशातील १३ नद्यांमधील पाणीच पूर्णपणे संपलेले आहे. तर गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधु, पेन्नार, नर्मदा, तापी, साबरमती, गोदावरी, महानदी, कावेरी यांचे पाणी गेल्या वर्षीपेक्षा वेगाने आटत चालले आहे.


देशातील नद्या या जीवनवाहिन्याच नाहीत तर ट्रान्सपोर्ट आणि वीज उत्पादनासाठीही मदतगार ठरतात. या नद्यांमुळे सामाजिक आणि आर्थिक विकास होतो. आयोगाकडे देशातील अतिमहत्वाच्या अशा २० नद्यांच्या बेसिनचा लाईव्ह डेटा असतो. यापैकी १२ नद्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणी आहे. कावेरी, पेन्नार आणि कन्याकुमारीच्या भागातील पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना सर्वात मोठे नुकसान झाले आहे.


भारतात एकूण नदी, तलाव अशी १५० महत्वाची जलाशये आहेत. या जलाशयांमध्ये आता ३६ टक्केच पाणी उरलेले आहे. यापैकी ८६ जलाशयांमध्ये ४० टक्के पाणी आहे. आयोगाने २८ मार्चची आकडेवारी जारी केली आहे. यापैकी सर्वाधिक जलाशये ही दक्षिणी राज्ये, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. रुशिकुल्या, वराह, बाहुदा, वंशधारा, नागावली, सारदा, तांडव, एलुरु, गुंडलकम्मा, तम्मिलेरु, मुसी, पलेरु आणि मुनेरु य़ा नद्यांचे पात्र सपशेल आटले आहे. या नद्यांद्वारे ८६,६४३ वर्ग किलोमीटर जमीन ओलिताखाली येते. IIT गांधीनगरनुसार अनेक भाग हा असाधारण दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे.



सर्वाधिक चिंता गंगा नदीमुळे...


सर्वाधिक चिंता गंगा नदीने दिली आहे. गंगेच्या खोऱ्यातील ६५ टक्के भाग हा शेतीचा आहे. ही नदी ११ राज्यांतून वाहते व काठच्या २.८६ लाख गावांमध्ये शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरविते. परंतु गंगेमध्ये क्षमतेच्या निम्म्याहून कमी पाणी आहे. गंगानदीचे पाणी आटणे हे शेतीला प्रभावित करणार आहे. नर्मदेवर ४६ टक्के शेती, तापीवर ५६, गोदावरीवर ३४ आणि महानदीवर ४९ टक्के शेत जमिन अवलंबून असते. या नद्यांचे पाणीही आटले आहे.


Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी