Dharavi Redevelopment: धारावीत अंतिम डेटा गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू

पहिल्या दिवशी ५० झोपड्यांचे सर्वेक्षण


मुंबई : धारावी हे एक शहरी पुनरुत्थानाचे मॉडेल व्हावे या दिशेने आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाने दुसरे मोठे पाऊल टाकले. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अंदाजे ५० झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. कमला रमण नगरमधील साक्षी सावंत यांच्या सदनिकेपासून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली.

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पासाठी १८ मार्च रोजी प्रत्येक झोपडीला युनिक नंबर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर लेन्सचे, लेसर मॅपिंग केले गेले. प्रत्येकी पाच सदस्यांच्या, पाच पथकांनी सदनिकाधारकांच्या निवासस्थानांना किंवा व्यावसायिक आस्थापनांना भेट दिली. येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला गती देण्यासाठी तैनात केलेल्या पथकांची संख्या वाढवली जाणार आहे.

सर्वात जुनी आणि नवीनतम वीज बिले, मतदार ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, गुमास्ता परवाना आणि बीएमसीने जारी केलेला हॉटेल परवाना यासारख्या कागदपत्रांच्या स्व: साक्षांकित छायाप्रती सर्वेक्षणादरम्यान गोळा केल्या. मूळ कागदपत्रे स्कॅन करून जागेवर सदनिकाधारकांना परत करण्यात आली.
Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे