ई-रिक्षामुळे घोडे व्यावसायिकांवर गदा

माथेरान : हातरिक्षा व घोडे हे वाहतुकीचे मुख्य पर्याय माथेरानमध्ये उपस्थित आहेत. ज्यावर येथील स्थानिकांचे अर्थचक्र चालते. माथेरानमधील सर्वात मोठा व्यवसाय घोडे व्यवसाय म्हटले तर वावगे ठरणार नाही. ४६० घोडे येथे पर्यटकांच्या दिमतीस आहेत व जवळजवळ ३०० कुटुंबे हा व्यवसाय करीत आहे. रिक्षांमुळे यांच्या व्यवसायावरती तर गदा येणार नाही ना अशी भीती नेहमीच घोडे व्यावसायिकांना वाटत असते. अनेक पर्यटक येथे फक्त घोडेस्वारीसाठी येत असतात. ई-रिक्षांमुळे त्यांच्या संख्येत घट तर होणार नाही ना अशी शंका येथील घोडेव्यवसायिक नेहमीच बोलून दाखवत असतात तर रिक्षांसाठी बनविण्यात येणाऱ्या क्ले पेव्हर ब्लॉक ला घोडे व्यवसायिकांचा विरोध आहे.


माथेरानमधले ९४ हातरिक्षा परवाने वितरित केले गेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र किती रिक्षा रस्त्यावर चालतात हा संशोधनाचा विषय आहे सध्या माथेरानमध्ये हात रिक्षा चालवण्याकरता खानदेशातील मजूर आलेले आहेत व तेच हा व्यवसाय करीत आहे व माथेरानमधील काही जुने ठराविक हातरिक्षा चालक या व्यवसायात अजूनही टिकून आहेत. ज्यांना खरोखर ई रिक्षाची गरज आहे. परंतु काही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा ह्या खानदेशी मजुरांना भाडेतत्त्वावर चालवण्याकरता दिल्या आहेत.


ई रिक्षा सुरू झाल्यानंतर या रिक्षांचे भाव गगनाला भिडले असून पंधरा हजार रुपये मध्ये विकली जाणारी रिक्षा आता सात ते आठ लाखांमध्ये विकली जात आहे. सध्या ३५ रुपये इतक्या माफक दरामध्ये चालणारी ही रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. परंतु कायमस्वरूपी सुरू झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार का. नाहीतर ज्याप्रमाणे घोड्यांचे भाव दस्तुरी येथून माथेरान साठी आकारले जातात तसे रिक्षाचे होऊ नये याची खबरदारी आतापासूनच रिक्षा चालकांना घ्यायला हवी तरच त्याचा फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे.असेही बोलले जात आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड