वाहनचालकांसाठी खुशखबर! टोलबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली: देशातील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने सांगितले की सध्या देशात टोलच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले की निवडणुकीपर्यंत टोलचे जुनेच दर लागू असतील.


याआधी बातमी आली होती की देशात १ एप्रिलपासून अनेक ठिकाणी टोलचे नवे दर लागू होतील. लखनऊ आणि आजूबाजूला तर टोल दरात ५ टक्के वाढीची घोषणाही झाली होती.


भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सांगितले होते की त्यांनी हायवेवरील नवे टोल दर हो लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत. साधारणपणे देशातील अधिकतर टोलच्या दरात १ एप्रिलला वाढ केली जाते मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की नवे दर लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत.


निवडणूक आयोगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दिल्या गेलेल्या आदेशात म्हटले की सध्यातरी दरवाढीचा हा निर्णय टाळण्यात यावा. देशभरातील हायवे आणि एक्सप्रेवेवर तब्बल ५ टक्के टोलशुल्क एक एप्रिलपासून वाढणार होते.


देशात १८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जूनला मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये यावेळेस ८५५ टोल प्लाझा आहेत.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू