रोहा : कालव्याच्या पाण्यावर आधारित केली जाणारी उन्हाळी हंगामातील भातशेती चांगलीच बहरल्याने शेतकरीवर्ग समाधानी दिसत आहे. रोहा तालुक्यातील डोलवहाळ बंधा-यातून कालव्याच्या सहाय्याने काही भागात उन्हाळी हंगामातील भातशेती पिकविली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीचे पीक हे शेतकरीवर्गाच्या हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते. तर कालव्यातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याचेही योग्य प्रकारे नियोजन करून आपल्याला आवश्यक असणारी पिके पिकविली जातात.
साधारणपणे डिसेंबर महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले तर साधारणपणे भातपिके तयार होतात. कधी पुरेसा हंगाम मिळत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते. परंतू या वर्षी पाटबंधारे विभागाकडून किमान वेळेत पाण्याचे नियोजन झाल्याने भातशेती बहरली. तर ढगाळ वातावरणामुळे पावसाची टांगती तलवारही डोक्यावर असल्याने त्याचा धसकाही शेतकरी वर्गाने घेतला.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…