शासकीय नोटरीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

  25

तहसीलमधील प्रतिज्ञापत्राची सक्ती; नागरिकांची गैरसोय


गौसखान पठाण


सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील एकमेव पाली नगरपंचायत कोणत्या ना कोणत्या गोष्टीने सतत चर्चेत राहणारी नगरपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे. असेच एका घटनेने पाली नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण विविध कामांसाठी नगरपंचायतकडून पब्लिक नोटरी न स्वीकारता केवळ तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्र बनवण्याची मागणी नगरपंचायतकडून केली जात आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरक त्रास होत आहे. शिवाय वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंड बसत आहे.


यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की पाली येथील वकील नोएल चिंचोलकर यांनी पाली नगरपंचायतीमध्ये आपल्या मुलाच्या विवाह नोंदणी करिता अर्ज केला होता. पाली नगरपंचायतीने ऍड. नोएल चिंचोलकर यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या विवाहाच्या नोंदणीकरिता त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी यांचे संयुक्त प्रतिज्ञापत्र मागितले होते. परंतु सदरचा प्रतिज्ञापत्र हा फक्त तहसील कार्यालयातूनच नोंदणी करून देण्याची सक्ती पाली नगरपंचायत अधिकारी यांच्याकडून केली
जात आहे.


चिंचोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र मे. पब्लिक नोटरी यांच्यासमोर करून देतो असे सांगितले असता संबंधित अधिकाऱ्यांनी चिंचोलकर यांना नोटरी करून आणलेला प्रतिज्ञापत्र आमच्याकडे स्वीकारले जाणार नाही असे सांगितले. यावेळी चिंचोलकर यांनी संबंधित अधिकारी त्यांना विचारणा करून प्रतिज्ञापत्र हे फक्त तहसील कार्यालयातूनच नोंदणी करून आणण्याबाबत शासनाचा तसा आदेश, शासन निर्णय अथवा पत्रक दाखवण्याची देखील विनंती केली. या प्रकरणांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की की, पाली नगरपंचायतीचे अधिकारी अलिखित कायद्याची सक्ती करताना दिसत आहे.


केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांनी नेमलेले नोटरी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उत्पन्न करीत आहेत. शिवाय तहसील कार्यालयातून प्रतिज्ञापत्र करणे म्हणजे वेळ व पैशाचा अपव्यय आहे. नोटरी शासकीय नियमाप्रमाणे असल्याने ती नाकारणे म्हणजे शासनाला आव्हान करण्यासारखे आहे. याबाबत पाली नगरपंचायत त्यांच्या अलिखित नियमांबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



प्रतिज्ञापत्र सक्ती करण्याबाबत वरिष्ठ कार्यलयाकडे तक्रार दाखल करणार


सर्वच सरकारी कामांमध्ये पब्लिक नोटरी स्वीकारले जातात. मग पाली नगरपंचायतमार्फत तहसील कार्यालयातील नोंदणीकृत प्रतिज्ञापत्राबाबत सक्ती का करण्यात येत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यलयाकडे तक्रार दाखल करणार आहे, असे ऍड. नोएल चिंचोलकर यांनी सांगितले.


संबंधितांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर विवाह नोंद करण्यात येईल, असे पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूणकर यांनी सांगितले.


Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड