Categories: कोलाज

वाचनाची गोडी…

Share

प्रासंगिक – रेश्मा मिरकुटे

पुस्तके ही माणसाची मित्रच नाहीत, तर गुरूही आहेत. कारण पुस्तकांतून मिळालेले ज्ञान भविष्यातील वाट दाखवते. याची सुरुवात लहानपणापासूनच होते; परंतु आजच्या काळात बालसाहित्य आणि साहित्य यांच्यातील अंतर वाढत आहे. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागावी म्हणून २ एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन साजरा केला जातो. काही दशकांपूर्वीपर्यंत मुलांच्या हातात पुस्तके असायची, आता ते मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर रमताना दिसतात. सध्या परिस्थिती अशी आहे की, मुले अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय काहीच वाचत नाहीत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

मुलांच्या वाचनाच्या सवयीच्या दृष्टीने ८० आणि नव्वदचे दशक हा सुवर्णकाळ म्हणता येईल. त्यावेळी टीव्ही आणि कार्टून चॅनल्स कमी होते. तंत्रज्ञानामुळे मुलांच्या सर्जनशीलतेवर परिणाम झाला आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं कॉमिक्स खरेदी करण्याचा हट्ट धरायची. कालांतराने मोबाइल फोन्सकडे कल वाढला आणि आताची मुले पुस्तकांपासून दूर जाऊ लागली.

खरं तर ही ८०-९० च्या दशकातील मुले म्हणजेच आताचे पालक. पण आता तेही सतत मोबाइलमध्ये गढलेले असतात. आजकालच्या आया मुलांना काही महिनाभराचेच असताना मोबाइल हातात देऊन गप्प करत असतात नि मग म्हणतात, ‘काय करणार मोबाइल दिल्याशिवाय काही खातच नाही हो!’ बाबा I mean पप्पाही त्रास नको म्हणून मुलांना मोबाइल हातात देतात. म्हणूनच जर मुलांना पुस्तक वाचनाची सवय लावायची असेल, तर त्याआधी या पालकांना वाचनाची सवय लावावी लागेल. कारण, मुले घरात जे पाहतात तेच करतात, कुटुंबात पुस्तक वाचण्याचे वातावरण असेल, तर नक्कीच मुलेही तेच करतील. पालकच जर दिवसभर मोबाइल फोन किंवा गॅझेटमध्ये मग्न राहिले, तर मुलांनी पुस्तके वाचावीत अशी अपेक्षा तरी कशी करणार?

बालसाहित्याशिवाय सुदृढ बालक किंवा सुदृढ समाजाची कल्पनाच होऊ शकत नाही, म्हणूनच जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये बालसाहित्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बालसाहित्याची सर्वाधिक गरज आहे.

एकत्रित कुटुंबांत रामायण, महाभारत, पंचतंत्र, अकबर बिरबलाच्या कथा, मालगुडी डेजच्या कथा मोठ्यांकडून ऐकत मुले मोठी झाली. प्रत्येक कथा मुलांना भारतीय संस्कृतीच्या जवळ नेणारी, आदर्शांचा धडा शिकवणारी, मनावर कोणतेही दडपण न ठेवता योग्य-अयोग्य यातील फरक दाखवणारी होती, पण तंत्रज्ञानाने मुलांना अशा पुस्तकांपासून दूर नेले. बालसाहित्याचे उद्दिष्ट हे बालकांमध्ये काहीतरी प्रेरणादायक करण्याची भावना निर्माण करणे हा आहे. यासाठी प्रथम मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.

चला तर मग या आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिनानिमित्त आपण शपथ घेऊया की, मोबाइल, गॅझेट्स किंवा महागडी भेटवस्तू याऐवजी आपण मुलांना पुस्तके भेट देऊ, जेणेकरून त्यांची सर्जनशीलता तर वाढेलच अन् त्यांना वाचनाची गोडीही लागेल.

Tags: reading

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

4 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

5 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

5 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

6 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

6 hours ago