Indian Navy: नौदलाची समुद्रात मोठी कारवाई! इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून सोडवण्यात यश

जहाजासह २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सचीही सुटका


मुंबई : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्त्व सिद्ध केलं आहे. नौदलाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एका इराणी जहाजाला यशस्वीरित्या सोडवले. इराणी जहाजासह इंडियन नेव्हीने २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सनांदेखील सुरक्षितपणे वाचवले. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ राबवलेल्या या ऑपरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे.


नौदलाला २८ मार्च रोजी संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासेमारी करणाऱ्या अल कंबार ७८६ हे जहाज ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेची मोहिम सुरु केली होती. या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने आयएनएस सुमेध आणि आयएनएस त्रिशूल या दोन युद्धनौका त्या जहाजाच्या दिशेने वळवल्या. या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या होत्या.


भारतीय नौदलाने एडनच्या खाडीजवळ समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि १२ तासाहून अधिक तासांच्या कारवाईनंतर २३ पाकिस्तानी नागरिक चालक दलाला भारतीय नौदलाने रेस्क्यू केले. तसेच इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वरील समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. या घटनेवेळी जहाज सोकोट्रापासून तब्बल ९० एनएम दक्षिण पश्चिमेत होते आणि समुद्री चाचे या जहाजावर होते.


दरम्यान, काही वेळातच आयएनएस त्रिशूल देखील या ठिकाणी दाखल झाले. अखेर १२ तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे आत्महसमर्पण केले. तसेच या बोटीवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली. अपहरण झालेल्या एफव्हीला २९ मार्च रोजी थांबवण्यात आले, असे नौदलाने निवेदनात सांगितले.

Comments
Add Comment

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला यलो अलर्ट नवी दिल्ली : उत्तरेकडून शीत लहरी महाराष्ट्राकडे वेगाने येत

ठाण्यात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात

ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १०००मि.

करतात काय रात्रीच्या वेळी मुली Google वर सर्च ; धक्कादायक अहवालाने तुम्हीही हादराल

या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे. मुंबई : 'गुगल ईयर इन सर्च २०२५

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर ; म्हणून न्यायालयाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत