Indian Navy: नौदलाची समुद्रात मोठी कारवाई! इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून सोडवण्यात यश

जहाजासह २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सचीही सुटका


मुंबई : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्त्व सिद्ध केलं आहे. नौदलाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एका इराणी जहाजाला यशस्वीरित्या सोडवले. इराणी जहाजासह इंडियन नेव्हीने २३ पाकिस्तानी क्रू मेबर्सनांदेखील सुरक्षितपणे वाचवले. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ राबवलेल्या या ऑपरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे.


नौदलाला २८ मार्च रोजी संध्याकाळी समुद्री चाच्यांनी इराणच्या मासेमारी करणाऱ्या अल कंबार ७८६ हे जहाज ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेची मोहिम सुरु केली होती. या माहितीच्या आधारे भारतीय नौदलाने आयएनएस सुमेध आणि आयएनएस त्रिशूल या दोन युद्धनौका त्या जहाजाच्या दिशेने वळवल्या. या दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आल्या होत्या.


भारतीय नौदलाने एडनच्या खाडीजवळ समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि १२ तासाहून अधिक तासांच्या कारवाईनंतर २३ पाकिस्तानी नागरिक चालक दलाला भारतीय नौदलाने रेस्क्यू केले. तसेच इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वरील समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. या घटनेवेळी जहाज सोकोट्रापासून तब्बल ९० एनएम दक्षिण पश्चिमेत होते आणि समुद्री चाचे या जहाजावर होते.


दरम्यान, काही वेळातच आयएनएस त्रिशूल देखील या ठिकाणी दाखल झाले. अखेर १२ तासांचे ऑपरेशन राबवल्यानंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे आत्महसमर्पण केले. तसेच या बोटीवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली. अपहरण झालेल्या एफव्हीला २९ मार्च रोजी थांबवण्यात आले, असे नौदलाने निवेदनात सांगितले.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे