नाशिक : तालुक्यातील धरणांचा जलसाठा खालवला आहे. दारणा, भाम धरणाच्या साठ्यात कमालीची घट झाली आहे. भावली धरणात अवघा १३ टक्के, तर मुकणे धरणात ३१.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल व मे मध्ये तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाई जाणवते. अनेक वाड्यापाड्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. कसारा घाट परिसरातील आवळखेड, चिंचलेखैरे या गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
या वर्षीही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. वैतरणा धरणातून पालघर जिल्ह्याला, तर भावली धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी दिले जाते. दोन-चार वाड्यांना धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवली, तर पाणीप्रश्न मिटेल. मात्र, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सोनोशी, मायदरा, वासाळी गावांनाही पाणीटंचाई जाणवत आहे. या भागांतही उन्हाळ्याच्या अखेर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या भागातील काही गावांसाठी भाम धरणातून पाणी आंबेवाडी शिवारात घाट माथ्यावर नेऊन स्वतंत्र पाणीयोजना कार्यान्वित आहे. अद्याप योजना अपूर्ण स्थितीत आहे.
तालुक्यातील मोठ्या धरण प्रकल्पांमध्येही महिन्याभरात साठ्यात मोठी घट झाली आहे. दारणा, मुकणे, भाम धरणाचा साठा कमालीचा घटला आहे, तर भावली धरणात जेमतेम १३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या १३ टक्के पाण्यात आगामी तीन महिन्यांचे नियोजन कसे करावे याची चिंता परिसरातील गावांना व शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच अनेक गावातील महिलांना दूरवरून हंड्याने पाणी उपलब्ध करावे लागत आहे.
दारणा : २४.८४
मुकणे : ३१.३६
वाकी: ४४.४६
भाम : २४.६३
भावली : १३.११
कडवा : २५.८३
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…