Water shortage : नाशिकमध्ये पाण्याचा तुटवडा! भावली धरणात १३, तर मुकणे धरणात केवळ ३१.३६ टक्के पाणीसाठा

दारणा, भाम धरणाच्या साठ्यातही कमालीची घट


नाशिक : तालुक्यातील धरणांचा जलसाठा खालवला आहे. दारणा, भाम धरणाच्या साठ्यात कमालीची घट झाली आहे. भावली धरणात अवघा १३ टक्के, तर मुकणे धरणात ३१.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल व मे मध्ये तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाई जाणवते. अनेक वाड्यापाड्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. कसारा घाट परिसरातील आवळखेड, चिंचलेखैरे या गावांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.


या वर्षीही टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. वैतरणा धरणातून पालघर जिल्ह्याला, तर भावली धरणातून ठाणे जिल्ह्याला पाणी दिले जाते. दोन-चार वाड्यांना धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवली, तर पाणीप्रश्न मिटेल. मात्र, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


तालुक्याच्या पूर्व भागातील सोनोशी, मायदरा, वासाळी गावांनाही पाणीटंचाई जाणवत आहे. या भागांतही उन्हाळ्याच्या अखेर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या भागातील काही गावांसाठी भाम धरणातून पाणी आंबेवाडी शिवारात घाट माथ्यावर नेऊन स्वतंत्र पाणीयोजना कार्यान्वित आहे. अद्याप योजना अपूर्ण स्थितीत आहे.



तीन महिन्यांचे नियोजन कसे करणार?


तालुक्यातील मोठ्या धरण प्रकल्पांमध्येही महिन्याभरात साठ्यात मोठी घट झाली आहे. दारणा, मुकणे, भाम धरणाचा साठा कमालीचा घटला आहे, तर भावली धरणात जेमतेम १३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या १३ टक्के पाण्यात आगामी तीन महिन्यांचे नियोजन कसे करावे याची चिंता परिसरातील गावांना व शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच अनेक गावातील महिलांना दूरवरून हंड्याने पाणी उपलब्ध करावे लागत आहे.



धरणांची नावे व साठा (टक्केवारीत)


दारणा : २४.८४


मुकणे : ३१.३६


वाकी: ४४.४६


भाम : २४.६३


भावली : १३.११


कडवा : २५.८३

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री