आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी, स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला आर्थिक देणगी!

  150

नवी मुंबई(प्रतिनिधी)- मरावे परी कर्तिरूपी जगावे या प्रमाणे करावे गावातील. दयानंद भास्कर तांडेल यांनी आपले वडील कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनी अनाथांची माय स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात देऊन, आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याच्या वसा पुढे सुरू ठेवला आहे. बेलापुर पट्टीतील करावे या गावाची धार्मिक, वारकरी संप्रदाय व संस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातच तांडेल कुटुंब धार्मिक, सामजिक शैक्षणिक कार्यासाठी परिचित आहे.


कै. भास्कर तुकाराम तांडेल यांच्या सामजिक कामाचा वसा हा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा दयानंद तांडेल यांनी पुढे चालू ठेवला आहे. आपल्या वडिलांच्या पाचव्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळयांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन या अनाथ आश्रमाला रु.१२१२१२/- देणगी स्वरूपात दिली.


यावेळी स्व. सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव श्री. विनय सिंधुताई सपकाळ, स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे, सिडको एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल, समाजसेवक सुभाष म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस