MI Vs SRH: सगळ्यात महागडा आयपीएल कर्णधार पॅट कमिन्सची आज हार्दिक पांड्याशी टक्कर

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या(Ipl 2024) हंगामातील ८वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदाबाद हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.


या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार पॅट कमिन्स आणि हार्दिक पांड्या यांच्यात टक्कर असेल. कमिन्सला हैदराबादने एका हंगामासाठी२०.५० कोटी रूपये देऊन खरेदी केले आहे तर पांड्याला मुंबईने ट्रेडच्या माध्यमातून संघात सामील केले आहे. त्याला १५ कोटी मिळाले आहेत.



दोन्ही संघ खाते खोलण्याच्या इराद्याने उतरणार


दुसरीकडे दोन्ही संघ मुंबई आणि हैदराबाद यांनी या हंगामात आतापर्यंत एकालाही विजयाचे खाते खोलता आलेले नाही. त्यांचा हा दुसरा सामना आहे अशातच आज पांड्या आणि कमिन्स दोघेही खाते खोलण्याच्या दृष्टीने मैदानात उतरतील. हैदराबादला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून ४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर मुंबईला गुजरात टायटन्सकडून ६ धावांनी हार मिळाली होती.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी