Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींचे भविष्य अंधारात, २०२६ पर्यंत आसाममध्ये नसणार काँग्रेस, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. आसाममध्ये निवडणुकीआधी प्रचारात गुंतलेले राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचे भविष्य अंधारात असून २०२६ पर्यंत काँग्रेस राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.


सोमवारी विश्वनाथमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा अर्थ राहुल गांधींना मत देणे. भाजपला मत देण्याचा अर्थ नरेंद्र मोदींना मत देणे. जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करतात आणि मानतात भारत हा विश्वगुरू बनावा ते या निवडणुकीत भाजपला मतदान करतील. जे लोक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात त्यांना माहीत आहे की त्यांचे भविष्य अंधारात आहे.



२०२६ पर्यंत आसाममध्ये काँग्रेस पक्ष नसणार


गेल्या दीड महिन्यात तुम्ही काँग्रेस पक्षाची घसरण पाहिली कारण अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले. माझ्या मते २०२६ पर्यंत आसाममध्ये कोणताही काँग्रेस पक्ष राहणार नाही.



चांगले नेते भाजपात सामील होत आहेत


लोकसभा निवडणुकीपर्यंत चांगले नेते भाजपात सामील होत राहतील आणि लोकसभा निवडणुकीनंतरही सामील होण्याची प्रक्रिया सुरू राहील.

Comments
Add Comment

Diwali Bonus Son papdi : 'बोनसऐवजी सोनपापडी' मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचा 'सूड'; संतप्त कामगारांनी मिठाईचे बॉक्स गेटबाहेर दिले फेकून, Video व्हायरल

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची

PM Modi On Trump Phone Call : ट्रम्प म्हणाले 'ट्रेड', तर मोदींनी दिले 'दहशतवादा'वर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत! फोन कॉलवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

Chhath Puja Special Railway : छठ पूजेसाठी भारतीय रेल्वे सज्ज! प्रवाशांची विक्रमी गर्दी पाहता १२०००+ विशेष गाड्या धावणार; सुरक्षेसाठी 'या' उपाययोजना

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आणि छठ पूजेच्या (Chhath Puja) सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी रेल्वे, बस किंवा विमानाने आपल्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या