तुर्भेगावातील एक गाव एक होळी उत्साहात संपन्न

नवी मुंबई(प्रतिनिधी): तुर्भेगावात पूर्वापार डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या पुढाकाराने व गावातील ग्रामपंचायत काळातील सरपंच जोमा बाळू म्हात्रे , दशरथ दत्तू घरत, रामकृष्ण बाळू पाटील , डी.आर.पाटील, गावचे पोलीस पाटील लक्ष्मण हिरा पाटील यांच्या काळापर्यंत तुर्भेगावात एक गाव एक होळी म्हणूनच गावातील ही एकता एकात्मता दृढमूल व्हावी या जाणिवेतून गेली दहा वर्षांपासून फोर्टी प्लस क्रिकेटचे संस्थापक प्रदीप पाटील यांच्या पुढाकाराने तुर्भे गावात एक गाव एक होळीची जुनी परंपरा पुन्हा सुरु झाली. काल उत्साहात संपन्न झालेल्या या होळीकोत्सवात गावातील जुन्या रुढी परंपरा साजऱ्या करताना सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.


तांदळाच्या पापड्या, करंज्या व पुरणपोळीचे नैवद्य आणि साखरेच्या माळा होळीला अर्पण करण्यात आल्या तर रात्री पारंपरिक नागेली नृत्यावर फेर धरीत आबाळ वृद्धांनी एकीचे दर्शन करुन दिले.होळीनिमित्त संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची ,चमचा लिंबू स्पर्धा विविध कार्यक्रम झाले यातही गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.होळी पेटवण्याचा मान दरवर्षीप्रमाणेयावर्षीही मंगल पोपट पाटील व गोपीनाथ पाटील यांना देण्यात आला होता.त्यानुसार रात्री साडेअकरा वाजता गावचा मानकरी म्हणून बाळारामबुवा पाटील यांच्या हस्ते होळीची पूजा करुन होळीला अग्नी दिला.


यावेळी सर्व गाव गुलालात न्हाऊन निघाला होता. यावेळी नवीन जावई बापूंचा ग्रामस्थांच्या वतीने हृदय सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ् नगरसेवक चंद्रकांत पाटील,विवेक पाटील,शुभांगी पाटील, शशिकला पाटील,रामचंद्र घरत आदी उपस्थित होते. यंदाचा होळीकोत्त्सव कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात तुर्भे ग्रामस्थांच्या वतीने गोपीनाथ पाटील, ललित म्हात्रे, साईनाथ पाटील, वसंत भरत पाटील, वसंत भिवा पाटील, विकास मोकल आदींनी विशेष मेहनत घेतली.यावेळी एपीएमसी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा कार्यक्रम यशस्वी पडण्यासाठी सहकार्य केले.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :