तुर्भेगावातील एक गाव एक होळी उत्साहात संपन्न

  70

नवी मुंबई(प्रतिनिधी): तुर्भेगावात पूर्वापार डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या पुढाकाराने व गावातील ग्रामपंचायत काळातील सरपंच जोमा बाळू म्हात्रे , दशरथ दत्तू घरत, रामकृष्ण बाळू पाटील , डी.आर.पाटील, गावचे पोलीस पाटील लक्ष्मण हिरा पाटील यांच्या काळापर्यंत तुर्भेगावात एक गाव एक होळी म्हणूनच गावातील ही एकता एकात्मता दृढमूल व्हावी या जाणिवेतून गेली दहा वर्षांपासून फोर्टी प्लस क्रिकेटचे संस्थापक प्रदीप पाटील यांच्या पुढाकाराने तुर्भे गावात एक गाव एक होळीची जुनी परंपरा पुन्हा सुरु झाली. काल उत्साहात संपन्न झालेल्या या होळीकोत्सवात गावातील जुन्या रुढी परंपरा साजऱ्या करताना सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.


तांदळाच्या पापड्या, करंज्या व पुरणपोळीचे नैवद्य आणि साखरेच्या माळा होळीला अर्पण करण्यात आल्या तर रात्री पारंपरिक नागेली नृत्यावर फेर धरीत आबाळ वृद्धांनी एकीचे दर्शन करुन दिले.होळीनिमित्त संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची ,चमचा लिंबू स्पर्धा विविध कार्यक्रम झाले यातही गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.होळी पेटवण्याचा मान दरवर्षीप्रमाणेयावर्षीही मंगल पोपट पाटील व गोपीनाथ पाटील यांना देण्यात आला होता.त्यानुसार रात्री साडेअकरा वाजता गावचा मानकरी म्हणून बाळारामबुवा पाटील यांच्या हस्ते होळीची पूजा करुन होळीला अग्नी दिला.


यावेळी सर्व गाव गुलालात न्हाऊन निघाला होता. यावेळी नवीन जावई बापूंचा ग्रामस्थांच्या वतीने हृदय सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ् नगरसेवक चंद्रकांत पाटील,विवेक पाटील,शुभांगी पाटील, शशिकला पाटील,रामचंद्र घरत आदी उपस्थित होते. यंदाचा होळीकोत्त्सव कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात तुर्भे ग्रामस्थांच्या वतीने गोपीनाथ पाटील, ललित म्हात्रे, साईनाथ पाटील, वसंत भरत पाटील, वसंत भिवा पाटील, विकास मोकल आदींनी विशेष मेहनत घेतली.यावेळी एपीएमसी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा कार्यक्रम यशस्वी पडण्यासाठी सहकार्य केले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर