कैदेत असताना आदेश देणे केजरीवाल यांना पडणार भारी ?; आता ईडी करणार ही कारवाई

नवी दिल्ली : कैदेत असताना आदेश देणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कोठडीत असताना मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल हे कसे आदेश देवू शकतात याबाबत कायदेतज्ञांची मते ईडीने मागविली आहेत. आतापर्यंत एखादया मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला अटक झाल्यानंतर तो आधी राजीनामा देत असे. केजरीवाल यांनी राजीनामा दिला नसला तरी, त्यांना त्या पदावर राहता येणार नाही, याबाबत कायद्यात काही तरतुद आहे का याची सखोल चौकशी ईडीकडून केली जात आहे.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे.कोठडीत असताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यातच त्यांनी कोर्टात असताना एक आदेश जारी केला. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी म्हटले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पाणी आणि सांडपाणी संबंधित लोक कल्याणाची कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ईडीने आता या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पीएमएलए कायद्यानूसार हा आदेश योग्य आहे की नाही याची तपासणी ईडी करणार आहे.


न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडीत असलेल्या केजरीवाल यांना त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल आणि खाजगी सचिव बिभव कुमार यांना दर सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान केजरीवाल यांना अर्धा तास भेटण्याची परवानगी दिली आहे. यातील अर्धातास केजरीवाल यांना त्यांच्या वकीलांशी चर्चा करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे या तासाभरातच केजरीवाल हे आपल्या पत्नी आणि सहाय्यक तसेच वकीलांना भेटू शकणार आहेत.

Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच