MVA -Vanchit Aghadi : अखेर मविआ-वंचित आघाडी युती फिस्कटली!

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाने समोर आले सत्य


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे चित्र आहे. वंचित आघाडी समोर ठेवत असलेला जागांचा प्रस्ताव मविआला मात्र मान्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे सांगत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची (Congress) वाट धरली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्यामुळे हे नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच मविआ-वंचित आघाडी यांची युती जवळजवळ फिस्कटल्याचे निश्चित झाले आहे.


संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.


संजय राऊतांच्या या विधानामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जागावाटपाबाबत सामंजस्याची भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही