MVA -Vanchit Aghadi : अखेर मविआ-वंचित आघाडी युती फिस्कटली!

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाने समोर आले सत्य


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे चित्र आहे. वंचित आघाडी समोर ठेवत असलेला जागांचा प्रस्ताव मविआला मात्र मान्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे सांगत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची (Congress) वाट धरली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्यामुळे हे नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच मविआ-वंचित आघाडी यांची युती जवळजवळ फिस्कटल्याचे निश्चित झाले आहे.


संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.


संजय राऊतांच्या या विधानामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जागावाटपाबाबत सामंजस्याची भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर