MVA -Vanchit Aghadi : अखेर मविआ-वंचित आघाडी युती फिस्कटली!

संजय राऊतांच्या 'त्या' विधानाने समोर आले सत्य


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देत असलेल्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे चित्र आहे. वंचित आघाडी समोर ठेवत असलेला जागांचा प्रस्ताव मविआला मात्र मान्य नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे सांगत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसची (Congress) वाट धरली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्यामुळे हे नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच मविआ-वंचित आघाडी यांची युती जवळजवळ फिस्कटल्याचे निश्चित झाले आहे.


संजय राऊत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे.


संजय राऊतांच्या या विधानामुळे दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जागावाटपाबाबत सामंजस्याची भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक