अजमेरमध्ये साबरमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर, एकाच रूळावर आल्या दोन्ही रेल्वे

Share

अजमेर: राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात एक रेल्वे आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. यानंतर एकच गोंधळ झाला. साबरमती आगरा कँट सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात अजमेर येथील मदार रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात घडला.

हा अपघात इतका भीषण होता की साबरमती आगरा कँट सुपरफास्ट एक्सप्रेसचे इंजिनसह ४ डबे रूळावरून घसरले. हा अपघात रात्री एक वाजून १० मिनिटांच्या सुमारास झाला. यावेळी मदार स्टेशनजवळ मालगाडी आणि एक्सप्रेस ट्रेन एकाच रूळावर आल्या.

यानंतर ट्रेनच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला मात्र साबरमती एक्सप्रेसची टक्कर मालगाडीशी झाली. या अपघातावेळेस ट्रेनमध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी होते. ट्रेन रूळावरूनर घसरल्यानंतर खूप दूर झाली आणि विजेचा खांबाला धडकली. यानंतर काही वेळाने रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

रात्री उशिरा झाला अपघात

रात्री १२.५५ मिनिटांच्या सुमारास ही रेल्वे अजमेर रेल्वे स्टेशनवरून निघाली आणि काही किमी गेल्यानंतर हा अपघात झाला. अपघाच्या वेळेस रेल्वेत बसलेल्या लोकांना जबरदस्त झटका बसला. जागेवर झोपलेली मुले, महिला आणि वयस्कर व्यक्ती सीटवरून खाली पडल्या.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

28 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago