BAN vs SL: एकाच सामन्यात दुखापतग्रस्त झाले बांगलादेशचे खेळाडू

मुंबई: बांगलादेशने श्रीलंकेला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने हरवले. बांगलादेशने मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. हा सामना चटगाव येथे सोमवारी खेळवण्यात आला. बांगलादेशने मालिकेत विजय मिळवला असला तरी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संघाचे चार खेळाडू एकाच सामन्यात दुखापतग्रस्त झाले आहेत.


वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, अनामुल हक, झाकिर अली आणि सौम्य सरकार दुखापतग्रस्त झाला आहे. दोन खेळाडूंची दुखापत इतकी गंभीर होती की त्यांना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले.


 


खरंतर, श्रीलंका वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. या दरम्यान मुस्तफिझुर रहमान आणि झाकिर अली दुखापतग्रस्त झाले. या दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले. मुस्तफिझुर रहमान श्रीलंकेच्या खेळीदरम्यान ४८वे षटक खेळत होता. या ओव्हरमधील पहिला बॉल टाकताना त्याला त्रास होऊ लागला. त्याची हालत इतकी खराब झाली की त्याला उठताही येत नव्हते. यानंतर स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.


बांगलादेश-श्रीलंका सामन्यांतील मोठी घटना ५०व्या षटकादरम्यान घडली. बांगलादेशकडून श्रीलंकेच्या डावातील शेवटची ओव्हर तस्कीन अहमद करत होता. त्याच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर प्रमोदने शॉट खेळला. बॉल हवेत होता. हे पाहता अनामुल आणि झाकिर दोघेही बॉलच्या दिशेने धावले. या दरम्यान दोघांची टक्कर झाली. झाकिर दुखपतग्रस्त झाला. दरम्यान, अनामुलने कॅच घेतला. त्याला स्ट्रेचरवरून न्यावे लागले.


बांगलादेशचा खेळाडू सौम्य सरकारही दुखापतग्रस्त झाला. तो बॉल रोखण्याच्या प्रयत्नात जाहिरातीच्या बोर्डाला जाऊन धडकला. त्याची मान बोर्डाला आदळली. या पद्धतीने बांगलादेशचे एकूण चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले.

Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करत शफाली वर्माची दमदार खेळी

नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या

भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने