निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडून मागितला पुढील ५ वर्षांचा रोडमॅप

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election) घोषणेच्या एका दिवसानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) रविवारी कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यात त्यांनी आपल्या मंत्र्यांना नव्या सरकारच्या पुढील १०० दिवसांसाठीची कार्ययोजना आणि पुढील पाच वर्षांसाठीचा रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले.


पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की ते आपल्या अधिकारी तसेच सचिवांकडून मंत्रालयाच्या नव्या सरकारच्या निर्मितीआधी १०० दिवस आणि पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार करून घ्या.


पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे यासाठी विकासाची कामे सातत्याने करत राहायला हवी. त्यांनी सांगितले की सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा तसेच ५ वर्षांचा अजेंडा काय असेल याचा रोडमॅप तयार केला जावा.


बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसोबत पुढील १०० दिवसांसाठी प्रमुख पैलू आणि डिलिव्हरेबल्सची रूपरेखा तयार करण्याचे काम सोपवले. कॅबिनेटची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या ठीक एक दिवसांनी झाली. शनिवारी निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली. याचे निकाल ४ जूनला घोषित केले जातील.


देशातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मेला, चौथा टप्पा १३ मेला, पाचवा टप्पा २० मेला, सहावा टप्पा २५ मेला, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.

Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना