Bhagvadgita : वस्तुनिष्ठ आदर्श भगवदगीता


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे व परमेश्वराबद्दलचे अज्ञान जे लोकांमध्ये आहे, मग आस्तिक असो की नास्तिक असो, हे अज्ञान सर्व धर्मियांमध्ये आहे, सर्व पंथांमध्ये आहे. हेच अज्ञान वाढत गेल्यामुळे द्वैत वाढत गेले. त्यातून श्रेष्ठ, कनिष्ठ ही भूमिका निर्माण झाली, कॉम्प्लेक्स निर्माण झाला, इनफेरिअटी/ सुपअरिअटी कॉम्प्लेक्स निर्माण झाले.



मी श्रेष्ठ दुसरे कनिष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ठ, माझा देव खरा तर दुसऱ्यांचा देव खोटा, माझा संप्रदाय बरोबर व दुसऱ्यांचा संप्रदाय चूक, असे निरनिराळे कॉम्प्लेक्स निर्माण झाले. ह्यांत आज माणूस अडकला आहे.



“गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे गुणे.” अर्जुन हा गुंतला होता तो अर्जुनपणांत. ह्या सर्व कल्पना आहेत. अर्जुनपणांत गुंतल्यामुळे हे माझे मित्र, ते माझे शत्रू; हे माझे नातेवाईक, बाकीचे लोक माझे नाहीत, ह्यांचा वध मी कसा करणार? मी जर युद्ध केले तर माझेच लोक माझ्या हातून मारले जातील. मला पाप लागेल, मी नरकात जाईन. ह्या सगळ्या कल्पना आहेत. भगवंतांनी याचसाठी अर्जुनाला गीता सांगितली. त्यात त्यांनी त्याला सांगितले की, ह्या साऱ्या कल्पना आहेत. तू हे जे काही बोलतो आहेस की तू कोण आहेस, हे कोण आहेत माहीत नाही म्हणून बोलतो आहेस.तुला जर कळेल की तू कोण आहेस, ते कोण आहेत तर तू हे बोलणार नाहीस. अर्जुनाच्या अपेक्षेत तो जो विचार करत होता त्या कल्पनेत गुंतला होता. ह्याचा परिणाम असा झाला की तो लढाईला तयार होईना. अर्जुन हा फक्त निमित्त आहे. भगवंतांनी भगवदगीता ही संपूर्ण जगासाठी सांगितलेली आहे. ह्यातून एक बोध घेतला पाहिजे, तो म्हणजे युद्ध अपरिहार्य का?



जगात जे दुष्ट लोक असतात, त्यांना प्रथम प्रबोधनाद्वारे वळविण्याचा प्रयत्न करायचा, मात्र ते वळतच नसतील तर त्यांना मारण्याशिवाय पर्याय नसतो. सांगूनसुद्धा जे सुधारत नाहीत, त्यांना बडवलेच पाहिजे. भगवदगीता हा आदर्श ग्रंथ का झाला? त्याने प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो, ते म्हणजेच वस्तुस्थिती स्वीकारून त्याला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न केला. भगवदगीता ही वस्तुनिष्ठ आहे. ती वास्तवाला धरून आहे. उगीच आदर्शवादाच्या मागे न लागता वस्तुस्थितीला धरून भगवंताने सगळ्या गोष्टी केल्या.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण.