मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली मैदानात दिसत नाहीये. तो पुन्हा एकदा बाबा झाला आहे. विराट आणि अनुष्काच्या घरी नुकतीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. मुलाच्या जन्मामुळे त्याने इंग्लंड मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले होते. तो लोकांच्या नजरेपासूनही दूर आहे. अशातच असा सवाल केला जात आहे की तो आयपीएल खेळणार की नाही? आणि जर खेळणार असेल तर कधी खेळणार.
विराट कोहली १९ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जॉईन करू शकतो. कारण या तारखेला टीमचा अनबॉक्स शो असेल. कोहली शेवटचा अफगाणिस्तानविरुदध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत दिसला होता. त्यानंतर तो लंडनच्या रस्त्यांवर दिसला होता.
दरम्यान, आरसीबी अथवा विराट कोहली यांनी कोणीही कन्फर्म केलेले नाही की तो १९ मार्चला संघासोबत दिसेल की नाही. याशिवाय याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की कोहली आयपीएल २०२४मध्ये खेळणार की नाही. कारण तो बऱ्याच दिवसांपासून दिसलेलाही नाही.
आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. यातही कोहलीच्या निवडीवर सवाल केले जात आहे. असे म्हटले जात आहे की त्याला टी-२० वर्ल्डकप संघापासून दूर ठेवले जाऊ शकते.
मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र लोक…
मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.…
मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी…
शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी…
गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी प्रकरणे मुंबई : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत…
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…