आयपीएल २०२४आधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका, हा खेळाडू दोन सामन्यांना मुकणार

  65

मुंबई: भारताचा अव्वल क्रिकेट सूर्यकुमार यादव टाचेच्या सर्जरीनंतर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. मात्र इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यांतील त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.



आयपीएलचे सुरूवातीचे दोन सामने खेळणार नाही सूर्या?


मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या अभियानाची सुरूवात २४ मार्चपासून करत आहे. त्यांचा पहिला सामना उपविजेता गुजरात टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. आयसीसी रँकिंगमधील हा अव्वल टी-२० फलंदाज पुनरागमनसाठी जोरदार प्रयत्न करत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार रिहॅबिलिटेशनच्या योग्य मार्गावर आहे आणि तो निश्चितपणे आगामी सत्रात पुनरागमन करेल.


दरम्यान, हे निश्चित नाही की एनसीएच्या स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीमने गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांविरुद्ध खेळण्यास परवानगी दिली की नाही.



मुंबई इंडियन्स आणि भारतासाठी महत्त्वाचा आहे सूर्यकुमार यादव


सूर्यकमार यादव मुंबईच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतके आणि १७१हून अधिक स्ट्राईक रेटसोबत २,१४१ धावा आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ४ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या फलंदाजीमध्ये सूर्यकुमारचे स्थान महत्त्वाचे आहे. सूर्यकुमारने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. तेव्हा त्याने टी-२०मध्ये भारताचे नेतृत्व केले होते.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट