वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे (Artificial Intelligence) एकीकडे लोकांची बरीच कामे सोपी झाली आहेत. मात्र, हळू-हळू एआयचे अनेक धोके देखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता याच एआयमुळे जगावर मोठे वीज संकटही येऊ शकते, असा एका रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल ५ लाख किलोवॅट वीज खर्च करतो. सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपले आपले एआय चॅटबॉट लाँच केले आहेत. एकट्या चॅटजीपीटीची आकडेवारी एवढी असेल, तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल, हा विचारच हादरवून टाकणारा आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते, त्या तुलनेत तब्बल १७,००० पट अधिक वीज चॅटजीपीटी दररोज वापरते.
चॅटजीपीटीच्या केवळ २० कोटी यूजर्ससाठी हा खर्च होतो. भविष्यात चॅटजीपीटीचा विस्तार झाला, त्याचे यूजर्स वाढले की पर्यायाने त्यासाठी होणारा विजेचा वापरही अधिक होणार आहे.
बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट अॅलेक्स डी. व्रीज यांनी सांगितले, की गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जनरेटिव्ह एआय वापरत आहे. एआयमुळे वर्षाला सुमारे २९ बिलियन किलोवॅट प्रतितास एवढी वीज वापरली जाते. केनिया, क्रोएशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठी देखील ही वीज पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
एआयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे, तेवढा त्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापरही वाढणार आहे. एआयचे यूजर्स सध्या तुलनेने अगदीच कमी आहेत. मात्र, भविष्यात जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये एआय पसरेल आणि यूजर्स वाढतील तेव्हा त्यासाठी होणाऱ्या वीजेचा वापरही भरमसाठ वाढणार आहे. यामुळे आतापासूनच एआय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित उर्जेचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…