Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेलने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लान महाग केले आहेत. हे दोन्ही प्रीपेड प्लान आहेत. एअरटेलने ११८ रूपये आणि २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. हे ४जी डेटा वाऊचक प्लान आहेत. अशातच आता ११८ रूपयांच्या प्लानसाठी तुम्हाला १२९ रूपये द्यावे लागतील. तर २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानसाठी तुम्हाला ३२९ रूपये द्यावे लागतील.



का वाढवली किंमत?


एअरटेलला आपल्या अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स म्हणजेच ARPUमध्ये वाढ करायची आहे. याच कारणामुळे चांगले रिटर्न मिळण्यासाठी एअरटेल आपल्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.



Airtelचा ३२९ रूपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला ४ जीबी डेटा ऑफर केला जाईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील.



Airtel चा १२९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये इतर कोणतेही जसे कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.

Comments
Add Comment

Bus Accidents Mumbai : मानखुर्दमधील बेस्ट बस दुघर्टनेची चौकशी करा, महापौरांनी दिले आदेश

सात महिन्यात बेस्ट बसच्या १० अपघातात १० जणांचे मृत्यू मुंबई : मानखुर्द येथील झालेल्या बेस्ट बस अपघातात (BEST Bus Accident)

Birth Certificate : जन्म दाखल्याच्या प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेचे नियमित होणार लेखापरिक्षण

जन्म दाखले वितरीत करण्याची प्रक्रिया त्वरीत सुरु करण्याची सभागृहाची मागणी प्रमाणपत्रातील नावातील बदलामुळे

BMC : महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

महापौर जेन नेक्स्ट सिविक फेलोजचा ठराव सभागृहात मंजूर मुंबई : मुंबईतील तरुणांना महानगरपालिकेच्या नागरी

Maharashtra Rain Update : सावधान! उद्या मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे-रायगडला ऑरेंज अलर्ट अलर्ट

- ६० किमी वेगाने वाहणार वारे मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले

BMC : मुंबईकरांना पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे BMC चे आवाहन

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे बृहन्‍मुंबई

Central Railway's Ashadhi Special Train : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना भेट! दादर-पंढरपूरदरम्यान धावणार 2 विशेष गाड्या; आरक्षणाला सुरुवात

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य