Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेलने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लान महाग केले आहेत. हे दोन्ही प्रीपेड प्लान आहेत. एअरटेलने ११८ रूपये आणि २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. हे ४जी डेटा वाऊचक प्लान आहेत. अशातच आता ११८ रूपयांच्या प्लानसाठी तुम्हाला १२९ रूपये द्यावे लागतील. तर २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानसाठी तुम्हाला ३२९ रूपये द्यावे लागतील.



का वाढवली किंमत?


एअरटेलला आपल्या अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स म्हणजेच ARPUमध्ये वाढ करायची आहे. याच कारणामुळे चांगले रिटर्न मिळण्यासाठी एअरटेल आपल्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.



Airtelचा ३२९ रूपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला ४ जीबी डेटा ऑफर केला जाईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील.



Airtel चा १२९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये इतर कोणतेही जसे कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध