श्री अंबिका योगाश्रमाचे ७ एप्रिल पासून मोफत योग शिबीर

नवी मुंबई(प्रतिनिधी) - : श्री अंबिका योगाश्रम ऐरोली शाखेच्या वतीने ऐरोली येथे सुरू असलेल्या मोफत योग प्रशिक्षण शिबिराचे नवीन बेंच ७ एप्रिल२०२४ पासून सुरू होणार आहे. यासाठी, आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन योगाचार्य श्री नित्यानंद प्रभू यांनी केले आहे. शिबिरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.


परमपूज्य हटयोगी निकम गुरुजी यांनी सुरू केलेल्या श्री अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या वतीने ऐरोली येथील ज्ञानदीप शाळा सेकटर-२ ऐरोली येथे योगाचार्य श्री नित्यानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमासिक मोफत योग शिबीरच्या माध्यमातून योगचे प्रशिक्षण दिले जाते. येत्या ७ एप्रिल२०२४ पासून नवीन बॅचला सुरुवात होत आहे.


निरोगी आयुष्यासाठी योगसाधनेचे महत्व लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन निरोगी आयुष्य जगावे, असे आवाहन श्री नित्यानंद प्रभू यांनी केले आहे. मोफत योग शिबीरासाठी आपले नाव नोंदणी श्री नित्यानंद प्रभू - ९८३३९३०९७९ क्रमांकावर संपर्क साधावा तसेच शिबिराच्या स्थळी देखिल नाव नोंदणी केली जाईल, असे प्रभू यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात