IND vs Eng: धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज चमकले

  69

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात ८ बाद ४७३ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह १९ तर कुलदीप यादव २७ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने २५५ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला संघ २१८ धावांवर आटोपला.



रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे शतक


पहिल्या दिवशीचा भारताने एक विकेट गमावला होता. यशस्वी जायसवालने ५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील आपले १२वे शतक ठोकले. रोहितने १५४ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितनंतर शुभमन गिलनेही १३७ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याचे हे चौथे शतक होते. दरम्यान, लंचनंतर टीम इंडियाला सलग २ झटके बसले. आधी बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. तर शुभमन गिलही जेम्स अँडरसनच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला.


त्यानंतर सर्फराज खान आणि देवदत्त पड्डिकल यांनी डाव सांभाळला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. पड्डिकलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावा केल्या. यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार