IND vs Eng: धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज चमकले

धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. सामन्यात दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात ८ बाद ४७३ धावा केल्या होत्या. जसप्रीत बुमराह १९ तर कुलदीप यादव २७ धावांवर नाबाद आहेत. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने २५५ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा पहिला संघ २१८ धावांवर आटोपला.



रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे शतक


पहिल्या दिवशीचा भारताने एक विकेट गमावला होता. यशस्वी जायसवालने ५७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधील आपले १२वे शतक ठोकले. रोहितने १५४ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितनंतर शुभमन गिलनेही १३७ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याचे हे चौथे शतक होते. दरम्यान, लंचनंतर टीम इंडियाला सलग २ झटके बसले. आधी बेन स्टोक्सने भारताचा कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. तर शुभमन गिलही जेम्स अँडरसनच्या बॉलवर क्लीन बोल्ड झाला.


त्यानंतर सर्फराज खान आणि देवदत्त पड्डिकल यांनी डाव सांभाळला. या दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी झाली. पड्डिकलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावा केल्या. यानंतर भारताने नियमित अंतराने विकेट गमावल्या.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक