उबाठा सेनेचा इलेक्शन फंड जमा करण्याचा हेतू

  107

आमदार नितेश राणे यांचा घणाघात


मुंबई : उबाठा सेनेला समाजाचे काही पडलेले नाही. पण आज सत्तेत नसल्यामुळे वसुलीची सगळी दारे बंद झाली आहेत. म्हणून ऑनलाईन लॉटरीच्या लोकांना घाबरवून त्यांच्याकडून इलेक्शन फंड जमा करायचा हा सरळ हेतू संजय राऊत यांच्या पत्रातून दिसत आहे. याबाबत कोणाला कुठून कसे फोन गेले आहेत. याचे खुलासे मी लवकरच जाहीर करेन, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.


पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले की, ऑनलाईन लॉटरी आणि जुगाराबाबत संजय राऊत यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले. अचानक पत्र लिहिण्याचे कारण काय? ऑनलाईन लॉटरी आणि जुगार महाविकास आघाडी सरकारच्या काळातही चालायचा. पण आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा हेतू आहे. उबाठाला निधी द्या अशा पद्धतीचा संदेश द्यायच्या हेतूने दिलेले ते पत्र आहे, असा गंभीर आरोप राणे यांनी केला.


हप्ते सरकारकडे जात आहेत की संजय राऊत यांना हप्ते मातोश्रीला जमा करायचे आहेत, याचे काही पुरावे माझ्याकडेही येत आहेत. आणि त्यासाठी मी विशेष पत्रकार परिषद घेणार असल्याचे राणे म्हणाले. ऑनलाईन लॉटरीवाल्यांना कसे धमकावले, घाबरवले गेले आहे. लोकसभेसाठी एवढे-एवढे पैसे द्या, नाहीतर आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू असे फोन गेले आहेत. त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे असल्याचे राणे म्हणाले.


महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. उबाठा महाविकास आघाडी सोबत राहील का? याचे चित्र लवकरच जनतेसमोर येईल, असा दावा नितेश राणे यांनी केला.


महायुती म्हणून प्रत्येकाचे मन सांभाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार लोकसभेसाठी निवडून देऊ. आमचे ४५ प्लसचे टार्गेट असून आम्ही एकत्र काम करू, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी